ताज्या भाजीपाल्याचे लवकर खराब होणे ही प्रत्येक गृहिणीची सामान्य समस्या आहे, ज्यामुळे अन्नाची नासाडी आणि आर्थिक तोटा होतो. या समस्येची गरज ओळखून, राजनंदिनी क्रिएशन्स ने खास गृहिणींसाठी एक विशेष उत्पादन तयार केले आहे - व्हेजी बॅग्स (VEGGIE BAGS).
व्हेजी बॅग्स या भाजीपाल्याला फ्रीजमध्ये ३ आठवड्यांपर्यंत ताजे ठेवण्यासाठी डिझाइन केलेल्या पिशव्या आहेत. या पिशव्या वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि सेट्समध्ये उपलब्ध असून, त्या धुण्यायोग्य (Washable) आहेत, त्यामुळे त्यांचा वारंवार उपयोग करता येतो.
आमच्या नवकल्पनशील उत्पादनांमुळे गृहिणींचे काम सोपे होते, आहाराची गुणवत् ता सुधारते आणि अन्नाची नासाडी कमी होते. टिकाऊपणा, गुणवत्तेची हमी, आणि ग्राहकांची गरज पूर्ण करण्याचा वसा घेत, आम्ही अन्न संरक्षणात नवे मापदंड निर्माण करत आहोत.